भीती हा तुझ्या मनाने तयार केलेला राक्षस आहे. नकारात्मकतेचा प्रवाह. प्रत्येक वेळी त्याने तुला काहीही क्रिया करण्यास अडथळा आणलेला आहे. आणि तू त्या आगीत इंधनच ओतले आहेस. पण तू जेव्हा तुझ्या भितिवर विजय मिळवशील तेव्हाच जीवनावर विजय मिळवशील.
सगळ्यात चांगला उपाय म्हणजे ज्या गोष्टी करायला तू घाबरतोस त्याच करायच्या. भीतीचे शास्त्र समजून घे. ती तुझी स्व:तची निर्मिती आहे. जशी दुसर्या कुठल्याही गोष्टीची तुझी निर्मिती तू नष्ट करतोस, फाडून टक्तोस, तशी भीती नष्ट कर. ही तुझी क्रिया तुला अमर्याद आत्मविश्वास, आनंद आणि मन:शांती देईल.
शिक्षक म्हणून समाज आपल्याकडे आदराने जरूर बघत असेनं...परंतु,विचार करा ज्या क्षेत्रात तुम्ही आणि मी काम करतो त्या क्षेत्रात तुम्हाला सन्मान आहे का ? आपल्यातलेच मूठभर हूजरेगिरी करतात. हूजरेगिरी करुन फक्त स्वतःचे प्रश्न सोडविता येतात आणि त्याचा त्रास मात्र इतरांना होतो. तेव्हा झुगारून द्या त्या सर्वाना. गाव करील ते राव करू शकत नाही हा इतिहास आहे. एकत्र येऊ तुमच्या, माझ्या आणि आपल्या सर्वांच्या हक्कासाठी आणि जाब विचारू शिक्षकांच्या सन्मानासाठी....त्यासाठीच हा उपद्व्याप.
Friday, November 7, 2008
Tuesday, September 30, 2008
प्रार्थना
प्रार्थना
विपत्तीमध्ये तू माझं रक्षण कर, ही माझी प्रार्थना नाहीविपत्तीमधे मी भयभीत होवू नये, एवढीच माझी इच्छा ॥
दु:ख तापाने व्यथित झालेल्या मनाचं तू सांत्वन करावं,
अशी माझी अपेक्षा नाही,
दु:खावर जय मिळवता यावा, एवढीच माझी इच्छा ॥
जगात माझं नुकसान झालं, केवळ फसवणूक वाट्याला आली,
तर माझं मन खंबीर रहावं, एवढीच माझी इच्छा ॥
माझं तारण तू करावंस, मला तारावंस ही माझी प्रार्थना नाही
तरून जायचं सामर्थ्य माझ्यात असावं, एवढीच माझी इच्छा ॥
माझं ओझं हलकं करून तू माझं सांत्वन केलं नाहीस,
तरी माझी तक्रार नाही,
ते ओझं वाहण्याची शक्ती मात्र माझ्यात असावी,
एवढीच माझी इच्छा ॥
सुखाच्या दिवसात नतमस्तक होवून मी तुझा चेहेरा ओळखेन,
दु:खाच्या रात्री सारं जग जेंव्हा माझी फसवणूक करेल तेव्हा,
तुझ्याविषयी माझ्या मनात शंका निर्माण होवू नये,
एवढीच माझी इच्छा ॥
-रविंद्रनाथ टागोर.
Subscribe to:
Posts (Atom)