Friday, November 7, 2008

का म्हणून कुणाला घाबरायचे?

भीती हा तुझ्या मनाने तयार केलेला राक्षस आहे. नकारात्मकतेचा प्रवाह. प्रत्येक वेळी त्याने तुला काहीही क्रिया करण्यास अडथळा आणलेला आहे. आणि तू त्या आगीत इंधनच ओतले आहेस. पण तू जेव्हा तुझ्या भितिवर विजय मिळवशील तेव्हाच जीवनावर विजय मिळवशील.

सगळ्यात चांगला उपाय म्हणजे ज्या गोष्टी करायला तू घाबरतोस त्याच करायच्या. भीतीचे शास्त्र समजून घे. ती तुझी स्व:तची निर्मिती आहे. जशी दुसर्‍या कुठल्याही गोष्टीची तुझी निर्मिती तू नष्ट करतोस, फाडून टक्तोस, तशी भीती नष्ट कर. ही तुझी क्रिया तुला अमर्याद आत्मविश्वास, आनंद आणि मन:शांती देईल.

No comments: